कालच्या पावसात एक घटना घडली.
झाडावरचं एक घरटं वा-यानी अचानक पडलं. दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते. त्यानी तिला पंखानी जवळ घेतलं. थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली. 'सकाळी बोलूयात', तो म्हणाला. 'हो', ती म्हणाली. रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले.
सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. तो उत्साहानी म्हणाला, 'निघूयात? नव्यानी काड्या आणू'. तिच्या डोळ्यात पाणी आलं. 'वेडी, "पाडणं" त्याच्या हातात आहे तर "बांधणं" आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत! चल निघूयात". आणि त्यांनी उंच आकाशत झेप घेतली.
...
....
कालच्या पावसात हे सगळ्यात सुंदर घडलं...........