काही भाव बोलून जातात, तो अर्थ प्रत्येक शब्दात नसतो. ओली हवा धूंद करते, ती साद नुसत्या हवेत नसते. काही नाती ओढ लावतात, ते प्रत्येक नाते प्रेमाचे नसते. प्रत्येक नाते प्रेमाचे हवे अशी काहीच गरज नसते, तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे याला खुप महत्व असते. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका.
कारण,अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.