एक काल्पनिक पण खरी वाटणारी 21 व्या शतकातील कथा...
एकदा कुत्र्यात अन गाढवात पैंज लागते कि जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गाव पलीकडच्या सिंहासनावर बसेन तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन....
ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले , कुत्र्याला वाटले मीच जिंकेन कारण गाढव पेक्षा मी जोरात धावु शकतो, पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते....
शर्यत सुरु झाली.....कुत्रा जोरात धाऊ लागला पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली, असाच प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात, प्रत्येक सिग्नल वर घडत राहिले....
कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला तर बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते तिकडे.... अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते
अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला..
...
....
"जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते"... सगळ्या ठिकाणी हिच शोकांतिका आहे ॥